Showing posts with label गणेश शिंदे. Show all posts
Showing posts with label गणेश शिंदे. Show all posts

सहजचं..

| |

आपल्याला ते आवडावेतं
ज्यांना आपण आवडतो...
नाहीतर निरर्थक गोष्टींसाठी,
आपण व्यर्थ आयुष्य दवडतो.
भावनांच्या भरात ऊगाच
हातंच सोडायला बघतो
अन पळणांर निसटून गेलं की,
परत हातंच्या मागं निघतो...
आयुष्य नेहमींच सुंदर होतं...सुंदर आहे..
थोडंस अॅडजस्ट केलं ना.. की,
खुशियो का समंदर आहे!!!

-गणेश शिंदे, दुसरबिडकर©®
9975767537

प्रश्न (मराठी कविता)

| |

मी फिरतोय..गरागरा..
एखाद्या सिलिंग फॅन सारखा..
पण अजुनही..हवं ते उत्तर मिळतं नाही...
..अन मिळणारही नाही..कदाचीत..
उत्तराची अपेक्षा तरी कोणाकडुुन???
अर्थात..माझ्याकडूनंच!
ज्याचा प्रश्न,त्याला उत्तर माहीत असतं....अस
म्हणतात.
..पण मात्र सगळ्याच वेळी नाही...
माझा नुसता प्रश्नचं जन्माला आला...
तो उत्तर घेऊन आलाचं नाही..
मग..,त्या अपेक्षीत उत्तराची कुठवरं वाट पहायची??
कधी?का?कुठवरं?आजन्म?
की मरेपर्यन्त?
की सगळे भोग सरल्यावर??
सगळे नुसते,प्रश्न अन प्रश्न..
विनाउत्तरांचे..
मनाच्या भासाचे की विरोधाभासाचे???
उत्तर मिळण्यात काय साध्य होईल?? माहीत नाही...
कदाचीत..काहीच नाही...
का?असं होवु शकत नाही का??
की,प्रश्नकर्ताचं प्रश्नासहीत ..संपून गेला तर??
ते सगळे प्रश्नचं नाही तर....
( उत्तराची अपेक्षा करण्याचा 'प्रश्नचं नाही...)

-गणेश शिंदे...
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

रोज... (कविता)

| |

रोज कितितरी माणसं भेटतात..
काही चांगली..काही वाईट..
काही दोहोंचा सुवर्णमध्य...
काही क्षितिज फाडून..
आभाळ कवेत घेणारी...
काही काळीज फाडून..
आबाळ करणारी...
काही ओळख नसतांना..
ओंजळी भरभरुन रिती करणारी...
काही ओळखीचा फायदा घेऊन..
त्यांची झोळीआपल्या ओंजळीनं भरणारी...
हम्म...असो...!!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

कोठुनी शिकले असे हे विस्तवाने..(गजल)

| |


कोठुनी शिकलेअसे हेे विस्तवाने
आतल्या आतून जळते म पहाणे?

ताठ मानेने जरा जगण्यास गेलो,
मोडले मज 'ताठ' पाहूनी जगाने..!!

गंध आयुष्या तुझा कळल्यावरी मग,
सोडला हेका कसा बघ अत्तराने..!!

प्रेम नुसते वाटण्याची गोष्ट नाही..
जाणले तर स्वर्ग आहे,बघ मनाने..!!

वायदा दुःखासवे कुठलाच नाही..,
पण तरी हा सोबती असतो सुखाने..!!

भावनाही स्वस्त झाल्या फार आता
माणसांनी काढले बघ कारखाने..!!

दूर गेली फार तू कुठल्या कलेने? 
तोडणे अवघड मला अंतर शहाणे..!!

श्री 'गणेशा' तोच माझ्या जिंदगीचा,
घेतला बघ श्वास जेव्हा काळजाने..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

देहास जाळण्याला मीही अधीर नाही(गजल)

| |

अग्नीस जोर यावा ऎसा समीर नाही...
देहास जाळण्याला,मी ही अधीर नाही.!!

आता तरी कळू दे,इजहार काळजाचे..
इन्कार ऎकण्याचा,कानास धीर नाही..!!

माझे मलाच कोडे,श्रावण कसा छळेना..
आता कळून आले,डोळ्यात नीर नाही..!!

दैवास दोष नाही,असलो जरी उपाशी..
ग्रीष्मातल्या झळांचे,कारण शिशीर नाही..!!

प्रेमात मी झुरावे,वाटे जरी मनाला.
पण कुंडलीत त्याने,लिहिलीच हीर नाही..!!

रचल्यात कैक गझला,कोणास याद नाही.  
नंतर कळून आले,मी फैझ-मीर नाही..!!

-गणेश शिंदे
दुसरबिड,बुलडाणा
9975767537

हरवला आहे...(मुक्तछंद)

| |

गावं तसं खुप वाढलयं......
नवे रस्ते..नव्या ईमारती
नवेचं लोक...नवी वस्ती
म्हणतात...पलिकडच्या अंगाला
कोण राहतं..कळतही नाही
कुणाच्या सुखदुखाला कुणी
फारसं कधी पळतंही नाही
इतकं वाढलयं गावं.........

भोर.. (हिंदी कविता)

| |

भोर...
(उन सभी माताओ को समर्पित जिन्होने इस बंजर मन
की भुमी में संस्कारो के बिज बोये थे..)
कल की भोर आज मुँह फेरे हुऎं है...
उजालो में भी अंधेरो के सांये मिले हुऎ है..!!
कल तक कान्हा के मुरली के स्वर..
कल तक मिरा की मधुर आलाप...
कल तक कबिरदास के दोहे... और..,

मला का दिले तू तिचे भास देवा..(गझल)

| |

मला का दिले तू तिचे भास देवा..?
मनाला उगा ही खुळी आस देवा..!!
मला दे किती ही कठिण जिंदगानी,
जरा भरवश्याचे असो श्वास देवा...!!
तुझ्या रोज ताटात नैवेद्य दिसतो..
कुठे मात्र मुश्किल कसा घास देवा..?
उरातुन हवा जोवरी खेळते ही..  
शिडाला कळो वादळी त्रास देवा..!!

हरवलेली कविता.. (कथा)

| |

एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत होते..

याद आहे..(गझल)

| |

यार नाही,प्यार नाही,फक्त झुरणे याद आहे..
तेच भागाकार आणिक शून्य उरणे याद आहे..!
कैकवेळा गायलो अन कैकवेळा ऎकले पण..
खास गाणी मैफलीची तीच स्फुरणे याद आहे..!
जिंदगीच्या फोडणीला भावनांचा जाळ आणिक..
वेदनेच्या लोणच्याचे मस्त मुरणे याद आहे..!
जीवघेण्या होत आहे रोजच्या त्या वंचना अन,
वल्गनेच्या ह्या शवाला फक्त पुरणे याद आहे..!

एवढीही खास नाही जिंदगानी (गझल)

| |

एवढी ही खास नाही जिंदगानी...
पण गळ्याला फास नाही जिंदगानी.!!
आकडेमोडीत नसतो खेळ सारा..
भूमितीचा तास नाही जिंदगानी..!! 
वाढता वय जाणले मर्मास मी ह्या..
सोडलेले श्वास नाही जिंदगानी..!!
रोज आभाळात मी कुठवर बघावे..?
चांदण्यांची रास नाही जिंदगानी..!!

मन कसे...तसे तसे..!!

| |

ओघळते खारे पाणी
गालाहुनी भलत्या क्षणी
आठवते असं कुणी
मनोमनी याद सुनी
नसलेले भास होती
दिसराती खास किती
रुसलेले श्वास देती
रिती रिती आस हाती
आज नसे तुझे हसे
मन दिसे वेडेपिसे
तुझे भासे जाणे असे
मन कसे....तसे तसे....!!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

पळपुट्या जखमा किती.. (मतलाबंद गझल)

| |

पळपुट्या जखमा किती मी सोसल्या देहावरी..
फक्त आहे ही इमानी काळजामधली खरी..!!

मानते मी धन्यता मज भेटला गजरा जरी..
मग कशाला चंद्र-तारे बोलशी काहीतरी..!!

लाजल्या नाही कधी जमिनीवरी येण्या सरी..?
ईश्वरा,काही फुले केलीस पण तू लाजरी.. !!

आपली आपण जरा राखून ठेवा पायरी..
नामयाच्या सारखी भेटेल नक्की पंढरी..!!

ऎनवेळी पावसा नाही बरी ही मस्करी... 
एकदा तू हो धरा, बघ काय जळते अंतरी..!!

कैकवेळा पार केली संकटांची मी दरी...
सांग मज नेशील ना आता सुखाच्या त्या घरी..?? 

सावलीसाठीच करतो मी उन्हाची चाकरी..
ईश्वरा सांभाळ माझी लेकुरे अन भाकरी..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

उपवास..(विनोदी)

| |

उपवास म्हटला की लगेचच पुलं आठवतात..हो पण माझा उपवास
पुलं च्या आसपास ही फिरकू शकत नाही.कुठे 'आयफेल'वरचे
पुलं आणि कुठं 'टिनशेड'मधला मी..असो ..पुलंच्या उपवासाच
कारण वेगळं होतं,माझा मात्र कारणांचा उपवास आहे..पुलं असते
तर त्यांच्यासोबत
लग्नाच्या पंगतीतही बसण्याची आपली औकात
नसती,लेखनपंक्तिची बात सोडाच..पण ऊगाच
मुलगा जसा बापाच्या शर्टाला धरुन मागेमागे जात असतो तसचं
मीही पुलं'बाबांचा अंगरखा धरून ,शेंबूड पुसत लिहिण्याचा पोटभर
प्रयत्न करेन.. पुलंचा उपवासाचा अन
माझ्या उपवासाचा 'विषय' जरी एक असला तरी 'आशय'
कुठेतरी वेगळा आहे,हे यथावकाश कळेलच आपल्याला....!!
''अहो..ऊठायचं नाही का आज,?आठ वाजून गेलेत..''
बायकोचा खणखणीत चिल्लर सांडल्यासारखा आवाज
आला अन मी दचकून पलंगावर ऊठून बसलो..'मी नाही..मी नाही''
बरळता बरळता बायको म्हणाली,'काहो?स्वप्नात माझ्या लपून
कुठले ऊद्योग चालू होते??'
तीच्या डोळ्यातला 'चटका'लागल्यावर पूर्ण शुध्दीवर
आलो..''अगं ,काही नाही,असचं आपलं..'' अन कसंनुस हसतं
उत्तरलो..'अहो,कलेक्टर ने आषाढी ऎकादशी ची सुटी 'डिक्लेर'
केली ते नुसत झोपायला का??मी हे विचारत होते की,आज
ऎकादशीचा उपवास करणार की,तुमच्यासाठी कुकर लावू??
बायकोला उत्तर देणार इतक्यात रोजच्या वरण
भाताच्या दुसर्या तागड्यात
मला साबुदाणा पोहे,चिप्स,बटाटे,रताळ्याचा खरपूस तूंप
टाकलेला शिरा,राजगुरा,दाण्याचे लाडू ई.ई.भरलेले आढळले,अन
साहजिकच फराळी यादीचं पारडं जड
झालं..मी मोठ्या भक्तीभावानं म्हणालो,''अगं
वेडे..अवघा महाराष्ट्र,अर्धा कर्णाटक अन अर्धा आन्ध्र
ज्या विठ्ठलाला भजतो,त्याचे आजच्या दिवशी गुणगाण
करतो,त्याच्यासाठी उपवास करतो,त्या 'सावळ्यासाठी' मी एक
दिवस उपवास केला तर बिघडलं काय??
बायकोला बहुदा माझ्या तोंडात जमा झालेली 'लाळ'
ऎव्हाना कळली होती..'बरं..बरं..'' असं म्हणून ती किचनकडे
वळाली..
मी घाईने ऊठलो,बाथरुम मधुन ब्रश व पेस्ट घेऊन 'पाकशाळेत'
गेलो..गॅसवर तेल पिऊन कढई बसलेली दिसली,हायसं
वाटलं..ब्रशवर पेस्ट घेतो न घेतो तोच झुरळ पाहिल्यासारखं
बायको किंचाळली,''ई...शि बाई..तो ब्रश आणि पेस्ट
ठेवा आधी..'' मला कळेचना,''अगं..काय झाल?
उपवासाच्या दिवशी भटजीबुवांनी दात
घासायची बंदी सांगितली का''? ''अहो..मी टिव्ही वर
बघितलयं,ब्रशचे केस प्राण्याचे असतात म्हणे,अन
पेस्टमध्येही हाडांचा चुरा मिक्स असतो''बायको दमात
ऊत्तरली...मला बायकोच्या तर्कशास्त्राचा हेवा वाटला..मी
म्हणालो..'वेडे..ते रंगवायचे ब्रश असतात,आणि पेस्टमध्ये काय
टाकतात हे बघणारी तू काय,'क्वालिटी कन्ट्रोल मॅनेजर' आहेस
का?? 'ते मला,कळतं नाही,तेलाल दंत मंजन आहे,आज त्याने
दात घासा'' तीने निर्णय जाहिर केला..'मग
यातही विटांचा चुरा असतो म्हणे'' मी खोचक
बोललो..''असेना का,विटा शाकाहारी आहे,अन तसही आज
'विटेचाच' मान आहे,घ्या मुकाट्याने''..आज दिवसभर
तीला किचनमध्ये त्रास द्यायचा असल्याने मी निमूटपणे
हा त्रास सहन करत होतो...
शुचिर्भूत होवून बातम्या घेत
असतांना,बायको आली..'अहो,निदान आज तरी थोडा 'हरीपाठ'
वाचावा माणसाने,सकाळी सकाळी''..मला झिणझिण्या आल्या,''अगं
बाई..मी काल रात्रीपासून काही खाल्लेल
नाही,उपासीपोटी कुठलही युद्ध जिंकता येत नाही,अन
देवालाही ते आवडतं
नाही..जा थोडासा बदामशिरा कर,मोठी प्लेटभरून..बाकी नंतर
सांगेन..'' माझा रवैय्या पाहून बायको,हळूच कानात
पुटपुटली...''आपलं पोट बघितलं का??
त्या कोपर्यावरच्या 'नटमोगरी' सारखं दिसते आहे,अन म्हणे
युद्ध,अन उपाशी'' तशी ती तनतनत किचनमध्ये गेली.. म्हणजे
एक गोष्ट मला कळाली होती..'नटमोगरी'ला दिवस
गेलेत..माझ्या पोटावरून हात फिरवत मी अंदाज बांधला..म्हणजॆ
तिसरा महिना..तरिच म्हटलं..अशात जरा नटमोगरी 'बेढब'
कशी दिसतेय.. ..:-)  :क्रमश:

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

हे रोजचे तुझे बघ.. (गझल)

| |

हे रोजचे तुझे बघ,लटके रुसून जाणे..,
पाणावल्यावरी मी,हलके हसून जाणे..!!

तू चाळतेस माझे,पंचांग रोज सखये..,
आता तरी जमूदे,शुक्राचे फसून जाणे..!!

होतात का असे हे,आभास पावलांचे..,
आवाज पैंजनांचे,कानी ठसून जाणे..!!

आहे फितूर येथे,जन्मास लाभलेले..,
त्यांचे छळून जाते,सोबत बसून जाणे..!!

वक्तृत्व दूर आहे,माझ्यामधून मित्रा..,
तरिही सभेस कळते,माझे असून जाणे..!!

सरकार तेच टिकते,ज्यांना जमून येते..,
तोंडास ह्या प्रजेच्या,पाने पुसून जाणे..!!

मोहास टाळणेही,घ्यावे शिकून आता..,
वाटेवरी श्रमाच्या,कंबर कसून जाणे..!!

सोडून दूर गेली,माझीच सावली मज..,
अंधार याद देतो,तुझिये नसून जाणे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर...

मी ऎवढा खास नाही.. ( कविता)

| |

मी एवढा खास नाही..
कोवळा मधुमास नाही..
चंदनापेक्षा ही झिजलो..,
पण मला सुवास नाही.. !!

प्राक्तनातच हाल होते..,
फक्त भिजले गाल होते..
शोधता अस्तित्व माझे..,
तेही फक्त कंगाल होते..!!

फाटली स्वप्ने जराशी..
बाळगू किती ऊराशी..
वेदनेचे चांदणे का..,
हाक देई,ह्याच दारी?

फार झाला खेळ सारा..,
यातनांचा हा शहारा..
हे विधात्या,एकदा दे..
ताठ होण्याचा इशारा..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

हे सगळं तुलाही जाणवतयं..(मुक्तछंद)

| |

वेडी आहेस तू...
मनाच्या भिंती..
मुकाट आसवाने सारवतेस..
कळूही देत नाहिस...
आतल्या मातीचा वास..!
वादळी पाउस होतेस...
अन सगळ्यांना छत्री देतेस...
तुझं बरसणं जाणवुही देत नाहीस..!
चुलीतली धग मनात ठेवून..
वर बर्फाचा थंड गोळा होतेस..
कुडकुडत राहते एकटीच..,
तापला निखारा होवून..!
खर तर...,
सगळ्यानाच देते काहीना काही...
मग का डोळे याचनाशिल??
बदलत्या ऋतूच्या हिंदोळ्यावर..,
मनाला झुलवतेस...!
सोड ना यार...सगळचं ते..,
माहितेय मला....
हे सगळं तुलाही जाणवतयं...!!
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
- गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537

काव्याग्रह: कवितेचा वसा.. (रसग्रहण)

| |

परवाच 'काव्याग्रह' चा छोटासा,सुटसुटीत पण साहित्याने ठासून
भरलेला, दिवाळी अंक हातात पडला..मनोवेधक मुखपृष्ठ
आणी अशोक कोतवालांची 'का रडताहेत मुली' ह्या कवितेवरून
आत बरचसं 'मनात' पोचणारं असेल,हे समजून गेलं.. जेमतेम
सहावा अंक..पण त्याला अंकाऎवजी 'वृक्ष' हे नाव...खरेच संपादक
विष्णु जोशी यांच्या कल्पकतेला साजेसं...कारण रोपटंही असलं
आणी तळपत्या उन्हात त्यानं
आसुसलेल्या जिवाला दिलेली थोडीशी सावलीही त्याला वृक्षपदावर
पोचविण्यास योग्य..तेच 'काव्याग्रह'बाबतही...!!
एकंदरीत अंक सुंदर वाटला..कवितांना वाहिलेला असल्याने,बर्याच
उत्कृष्ट कविता वाचावयास मिळाल्या...'अक्षरांचे सूर'
ह्या किशोर बळींच्या
काव्यसंग्रहाच सदानंदजी सिनगारे ह्यांच सुंदर
समिक्षण,अनिलजी कांबळे यांच्या 'झोपडी नं 12' चं, बाबाराव
मुसळे ह्यांनी केलेलं विश्लेषण..तसेच अजिम नवाज
राही यांच्या 'कल्लोळातला एकांत'ला,नामदेव चं.कांबळे
ह्यांच्या लेखणीतून मिळालेली योग्य दाद..खरोखर वाचनीय..जणू
सगळेच संग्रह वाचल्याच समाधान..!!
कै.षाबा कुडतरकर ह्यांच्या मूळ कोकणी कवितांचा,डाॅ.अन
ुजा जोशींनी केलेले मराठी अनुवाद बरचसं वेगळं
वाचल्याची अनुभूति देतात..स्मिता पाटील,रमेश वाघमारे,समाधान
खिल्लारे,मनिषा साधू,विलास अंभोरे,बालाजी मदन इंगळे,रविंद्र
जवादे,जगदीश पाटील,रावसाहेब कुंवर,मावध पवार,कैलास
पगारे,गजानन फुसे आदी कविंच्या कविता खरचं वाचनीय
झाल्यात..
केतन पिंपळापुरे यांच्या 'मकाबी' काव्यसंग्रहाचं वेगळेपण मोतीराम
कटारे ह्यांच्या लेखणीतून फार सुंदर उतरलयं..कविता विचारात
पाडतात माणसाला..!!
दिलीप विरखडे यांच्या 'ऎन पस्तिशीत'
ह्यांच्या कवितेच्या 'व्हरायटीज' किरण डोंगरदिवे हे विविध अंगल
मधुन वाचकापर्यन्त पोचवतात..अशा बर्याच गोष्टीतून साकारत
अंकाच वेगळेपण बरं वाटल..आतूनबाहेरून मुखपृष्ठ,मलपृष्ठ
सोडल्यास बाकी अंक कृष्णधवल आहे,पण वाचतांना हे मुळीच
जाणवत नाही..हे लक्षात येते अंक पुर्ण वाचून,विचार
करत,उगाचच चाळतांना...कदाचित अंकाच्या दर्जेदारपणाच हेच
लक्षण अन कौतुक असु शकतं...
पण जरा दोन गोष्टी नमुद
कराव्याशा वाटतात..मराठी गझला बहुदा नाहितच अंकात...शक्य
झाल्यास कवितांसोबत मराठी गझलेलाही योग्य न्याय
द्या...आणी दुसरं म्हणजे संपादक विष्णु जोशी फार छान
लिहितात,मी त्यांच्या तोंडून समक्ष ऎकलयं त्यांना..तर
त्यांनीही मनाला जे वाटलं..भावलं..ते 'संपादकाच्या लेखणीतून..'
अशाप्रकारच्या सदरातून वाचकांपर्यन्त पोचावं..ही प्रांजळ
ईच्छा...
बाकी अंक छान जमलाय..संपादक ,काव्याग्रह टिमचे अभिनंदन
आणी काव्याग्रहच्या भावी वाटचालीस शुभकामना....!!
(अधिक संपर्कासाठी..
काव्याग्रह प्रकाशन,
डाॅ.घुनागे हाॅस्पिटलमागे,मुख्य पोस्ट कार्यालयासमोर,व
ाशिम,ता.जि.वाशिम..444505..
मो.9623193480 )
e-mail: vishnujoshi80@gmail.com

-गणेश शिंदे,दुसरबिडकर
9975767537


गणाचे अभंग (अभंग)

| |

रातपंखाखाली
झोपलेला गाव,
जागा झाला घाव..
मनातला.. !!

वेदनांचा टाहो,
मावेना मनात..
सतत कानात..
घंटानाद.. !!

आयुष्य सुखाने
जगू देत नाही
मरू देत नाही
सुखासुखी..!!

ईश्वरा जरासा
घेरे बापा त्रास
लेकरांना घास
मिळो सदा.. !!

आयुष्या तुझी ही
रोजची उधारी..
माझी ही नादारी
सोसवेना..!!

खुप झाला वेळ
येईना तू कसा
मृत्यू भरवसा
तुटताहे..!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537

बापू.. (व्यक्तिचित्रण)

| |

बालपणीचा काळ खरचं सुखाचा असतो..मग ते बालपण
कितीही गरिबीतले असले तरिही..आमच कुटूंब खर्या अर्थान
फार मोठ्ठ होत...जवळपास वडिल धरुन
सहा चुलत्यांचा विस्तार..सगळ्याच्या चुली वेगळाल्या पण
बाकी कारभार सगळा एकत्र..सगळ्याच्या एका रांगेत दोन
दोन
खोल्या होत्या..अन बाहेर एक ऊंबराच आभाळ कवेत घेणार
एक
मोठ्ठ झाड..आणि त्या झाडाखाली एक
बांबूची,सणकाड्यांनी शाकारलेली झोपडी असायची अन तिथे
रहायचा या सगळ्या खटल्यावर लक्ष
ठेवणारा 'सम्राट'..बापू..आमचे आजोबा..!!
आजी बापूला केव्हा सोडून गेली मला कळत नव्हते..पण
तेव्हापासुन बापूंनी सगळ्यांच्या खोल्यापुढ
निवारा शोधला होता..मला आठवतं,बापू कुणाच्याही खोलीत
कधी गेलेच नाही..रापलेला चेहरा,पण माया दावणारे बारिक
डोळे,चिलिम ऒढुु ओढु खप्पड झालेल्या गालावर पिळ
दिलेल्या मिशा,तुळतुळीत दाढी,डोक्याला सदैव
पिवळा पटका,मस्तकावर अष्टगंध
आणि बुक्का..कानाच्या दोन्ही पाळूला दारावतीचे
ठिपके...काही शाबुत तर काही दातांनी रामराम
ठोकलेला,सहा फुट ऊंचीला शोभणारी शरिरयष्टी..अन सतत
हातातल्या तुळशीच्या माळेशी,बोटांची चाललेली स्पर्धा..पायात
करकर वाजणारी नर्ही अन धोतर-
बंडीतली ती मूर्ती आजही आठवते..
आमच पन्नास ऎकराच्याही वरच रान असेल तेव्हा..पण सगळ
ऎकत्र होतं..बायाबायांची भांडण नव्हती..भावाभावांचे वाद
नव्हते..फक्त स्वयंपाक वेगळा अन
झोपायच्या खोल्या..बाकि सगळ्यांची जेवण सकाळ
संध्याकाळ
बापूच्या समोर
ऊंबराच्या झाडाखाली गोपाळकाला व्हावा तशी व्हायची..बापू
जास्त बोलायचे नसत मोठ्यासोबत..पण आम्हा लहाणासोबत
अगदी लहान होवून
रमायचे..माझ्यापेक्षा माझ्या मोठ्या बहिणीवर बापूंचा जीव
जास्त..ती जरा तब्येतीने सगळ्या मुलात कृश होती..मी तर
पहिल्यापासून दांडगटच..त्यामुळे आमच्या चोरून बापू
तीला खोबरं,गुळफुटाणे,पेरू अस जे दिसेल ते आणायचे..तिने
खाऊन ऊरल की मग बापू आम्हाला हाळी द्यायचे..पण
म्हणून
ते आमच्यासाठी वाईट कधीच झाले नाहित..ऊलट
त्या बहिणीकरता अन बापूकरिता आमचा जीव अधिक
तुटायचा..
बापू सुनांना म्हणजे आईना ,काकूंना कधहि ऎकेरी बोलायचे
नाही..अहो-जाहो करायचे..वडिलांच्या अन
चुलत्यांच्या बाबतीतही तेच..बापूना कधी सुनांना जेवण
मागण्याच
काम पडल नाही..कारण बापू आल्याशिवाय कुणिच
जेवायला बसायच
नाही..आमच्यासारखी चिल्लीपिल्लीही बापूच्या वाटेकडे डोळे
लावून असायची..बापूकडे
गोष्टींचा खजाना होता..ऊडती माडी,फिरता कळस,कळवातनीची
कथा,दामु सुताराची कथा न जाणो अशा कैक
गोष्टींना आमच्याबरोबर
रात्रीला मोठी माणसही हजेरी लावायची..बापूची चिलिम खास
आवडायची मला..त्यातील कपडा पाण्याने धुवून देणे ,तंबाकु
साफ करणे,खडा पुसून देणे ई.कामे
करता करता मलाही कधीकधी ती ओढून पहायचा मोह
होई..पण
ऎकदाच नुसती चिलीम ओठाला लावून पाहण अन
बापूंची सनकन
गालात वाजण झाल..तेवहापासून तो मोह आवरला..पण सुप्त
ईच्छा आजतागायत कायम आहे..
आमच रान फारस पिकायच नाही..किंवा तॆव्हाचा काळच
दुष्काळाचा होता अस म्हटल तरी हरकत नसावी..त्यामुळे
रानात मिळणार्या गोष्टींचेच खेळणे,खाणे
असा लळा बापूंनी लावून दिला होता..बापूंना मात्र
चहा हमखास
दोनचार वेळेस लागायचा..गूळाचा..दुध नसले तरी चालेल पण
त्यांच ऎक पितळी दिड दोन कपाच 'गटले' असायच ते भरुन
चहा लागायचा..पण ते ही कोणत्या सुनेला सांगायच काम
नव्हत..कुणीही चहाच आंदण ठेवल की ती ऒरडून
सांगायची,'बाईवो,म्या मामाजीले च्या ठुला बरं..' अन
बापूच्या चेहर्यावर स्मीत
पसरायच..मी सहा वर्षाचा होईपर्यन्त
मला बापूचा साथ लाभला होता..बापूच्या आठवणी खुप
आहेत,मला फारशा आठवत नाही..पण
जितक्याही आठवतात,तरळलेल्या डोळ्यातून बापू दिसतात..
अखेरच्या दिवसात बापू फार खंगले होते,खाण्यापिण्याच
काही ददात नव्हती..पण या वळणावर त्यांना 'आजी जास्त
आठवत असावी..त्यांच चिलिम पिण्याच प्रमाण ही खुप झाल
होतं..सतत खोकॊक..रात्री बेरात्री खोकल्याची उबळ
ऎकल्यावर पटकन बाबा अन चुलते तिकडे
धावायचे..सगळ्यांना..व बापूंनाही कळून चुकलेल
होत..होणारी गोष्ट होणार आहेच..गावात डोक्टर नव्हतेच,एक
दिवस असीच जोरदार उबळ आली..वडिलांनी पटकन
गाडी जुंपून
बापूला गाडीत घेतले सोबत लहाने चुलते व शहराच्या दिशेने
धावले..पण सकाळपर्यंत बापूच निष्प्राण कलेवर दारात
होत..बापून घरादाराला काय दिल त्यावेळी कळतं नव्हत..आज
जाणवतय,बापूंनी घराला 'घरपण' दिलं होतं....!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
9975767537