तुझी आठवण येते....

| |

तुझी आठवण येते...जेव्हा
सुर्य अस्ताला जातो
पक्षी घरट्याकडे वळतांत
बाजार संपल्यावर माणसं जशी
घराच्या ओढीनं पळतांत...
तुझी आठवण येते..जेव्हा
हसरी माणसं भेटतांत
लाजरी मुलं बोलतांत
निशिगंधाची फुलं जशी
ऎक ऎक करुन फुलतात
तुझी आठवण येते...जेव्हा
डोळ्यात अश्रु मावतं नाही
झाडे स्तब्ध, हलतं नाही
डोंगराआडचा सुर्य जेव्हा
वेळ होवुनही कलतं नाही..
तुझी आठवण येते...जेव्हा
कुणीतरी टचकन् बोलतं
अन् बापड मन जळतं
आपुलकीच्या सावलीसाठी
डोळे मिटुन सैरभैर पळतं
तुझी आठवण येते...जेव्हा
डोळ्यात अंधार दाटतो
काही दिसेनासं होतं
निळ्या आभाळात मन उडून
काही सुचेनासं होतं 
तुझी आठवण येते...जेव्हा
मोरपिस अलगद शरीरांवर फिरतं
तुझ्या सुगंधित श्वासासारखं...
रोम रोम रोमांचित करुन
अचानकचं पुन्हा हरवतं..
तुझ्या दूर जाण्याच्या भासासारखं
तुझी आठवण येते...जेव्हा
तुझ्याजवळून चोरून जपलेला
क्षण अन क्षण आठवतो 
अन त्याचवेळी अलगद मी
मनातलां पाऊस डोळ्यात साठवतो
म्हणुनचं...........  
तुझी आठवण आली की
मी स्तब्ध बसुन राहतो
भुतकाळाचे सांधलेले धागेदोरे
ऎक ऎक उसवून पाहतो.....
-निशिगंध (गणेश शिंदे® दुसरबिडकर)