बाॅर्न इन द गारबेज (रसग्रहण)

| |

लघुकथांनी मराठी साहित्याचं फार मोठं क्षेत्र व्यापलेल
आहे.आजच्या पिढीच्या लघुकथा पुर्वीच्या कपोलकल्पित
किनारी,चन्द्रतार्यांच्या साक्षी,बागेतल्य
ा गुजगोष्टी इत्यादींना फाटा देत
आपल्या अवतीभोवतीच्या नोंदींना डोळसपणे बघायला शिकवत
आहे.लघुकथांच वैशिष्ट्यच अस असत की,त्या एका ठराविक
वळणावर वाचकांना आणून सोडतात..तिथून पुढचा विचार
वाचकांना करायचा असतो..नव्हे तो आपसूकच केल्या जातो..!
चार दिवसापुर्वीच आमचे मित्र प्रा.सावन गिरीधर धर्मपुरीवार
यांनी मोठ्या अगत्याने पाठवलेला,त्यांच
ा पहिलावहिला लघुकथासंग्रह 'बाॅर्न इन द गारबेज' साभार
भेटला..विजय प्रकाशन,नागपुर ह्यांनी प्रकाशित केलेला,विवेक
रानडे ह्यांचे सुंदर मुखपृष्ठ आणि के.ज.पुरोहित 'शांताराम' व
आशाताई बगे यांची सुंदर प्रस्तावना लाभलेला..व तितक्याच
आशयघन,काळजाचा ठाव घेणार्या कथांनी परिपुर्ण
असलेला..मुखपृष्ठावर 'गारबेज' मध्ये असणार्या वस्तुत
दिसणार्या 'लाल' रंगाच्या ठिपक्यांनी कथा वाचण्याच्या अगोदर
बरचं काही सांगितल..संग्रहाच नाव नी बर्याच
कथा इंग्रजी शिर्षकात आहे..पण उलट त्याने काही वावगं वाटल
नाही..लेखकाच वेगळेपण,कथांच नवेपण ह्या नावांनी अधिक ठळक
जाणवतयं..नव्हे ते समर्पकही आहेच..!
लेखकाच्या बर्याच
कथा स्वतःच्या अवतीभोवती घडलेल्या वाटतात.रोजच्या जगण्याच्या धावपळीतून
आपल्या आजुबाजुला बघण्याची लेखकाची दृष्टी सकस
आहे.'नागपुरी वैदर्भीय बोली' व नागपुरच्या आसपासचे संदर्भ
लेखकाची आपल्या मातीशी घट्ट असलेली नाळ दर्शवितात..!
एकून नऊ कथांचा समावेश असणार्या ह्या संग्रहाने आपले
'वेगळेपण' निश्चित जपले आहे.पहिल्याच 'मेजवानी' कथेत
माणसांचे स्वार्थी,विकृत चेहरे,मेलेल्याला पुनः मारणारे,मुडद्या
ंच्या टाळूवरचं लोणी खाणार्या नराधमांचे दिसतात.मन,सुन्न
होत..,अन आपल्या भोवतालचे 'असे' चेहरे ठळक
जाणवायला लागतात.'मोलकरीन' कथेत मोलकरणींची कामे
करून,शिक्षणात यश मिळवणार्या 'गौरी'च कौतुक वाटत..पण
गौरीच्या मेहनतीला सलाम करणार्या,जीवनाच तत्वज्ञान
समजलेल्या 'केतकी'चा खर्या अर्थान अभिमान
वाटतो.कथेची खरी नायिका 'केतकी'च हे जानवून जात.'वेटींग फाॅर
व्हॅलेन्टाईन' वाचत वाचत शेवटापर्यन्त जातांना, एका तरल
प्रेमकाव्याच्या विश्वात विहरल्यासारखे वाटते.सुंदर शब्द
नी मनाचा ठाव घेणार्या खोल विहिरीसारखं..पण
शेवटी नायकाला 'कॅन्सर' असल्याच कळल्यावर नकळत
'कारुण्याची किनार' मनाला उदास करून जाते.!!
'एकोणतीस मार्च' संग्रहातली सगळ्यात उत्कृष्ठ
कथा ठरावी.,ईतकी ती वाचकांच्या काळजाला हात
घालते..नकळतचं डोळ्यांच्या कडा पाणावल्या जातात..याच खास
श्रेय..लेखकाच्या डोळस असणार्या सामाजिक दृष्टीला...'सवारी'
'जाईजुईंनी गच्च भरलं आकाश' ह्या कथा सामान्यांचे
जगण्याचे,मुलभूत गरजांचे व यामधून
होणार्या जिवाच्या घालमेलीच दर्शन घडवतात.'बायोग्राफी'
कथेतून महाविद्यालयीन शेतकरीपुत्राच मनोविश्व
वाचतांना काळीज करपून जाते..शेतकर्यांच्या समस्यांच्या जवळ
जाणारी कथा..'सेमिनार' ही कथाही अशीच वाचकांवर आपली छाप
सोडून जाते.!!
शिर्षक कथेत,आजच्या भरकटलेल्या तरुणाईच यथार्थ चित्रण
करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत..आजच्या स्वैर
नातेसंबधातून जन्माला आलेल्या अर्भकांची ससेहालपालट
कमालीची अस्वस्थ करते..चिड येते.!
प्रा.धर्मपुरीवार यांचा पहिलाच प्रयत्न प्रभावीपणे, सशक्तपणे
वाचकांच्या पसंतीस उतरला जातो..लेखकाच नवखेपण
कुठेही जाणवत नाही..काळाच्या ऒघात वाहवत असतांना,क्षणभर
का होईना,थोडसं थांबून आपल्या आजुबाजुला बघायला लेखक
भाग पाडतात..!!
प्रा.सावन गिरीधर धर्मपुरीवार यांचे अभिनंदन
आणि भविष्यासाठी खुप शुभेच्छा...!!

-गणेश शिंदे,दुसरबिडकर..
  9975767537